Monday, June 21, 2010

एक झुंज वार्‍याशी - पुलंचे नाटक - रसग्रहण - भाग २

अंक पहिला -
ह्या नाटकामधे पात्रे चारच आहेत डॉ. देशमुख, डॉ. चौधरी, माणुस, व चित्रा, पण संवादामधे इतारही काही महत्वाची पात्रे येउन जातात उदा. डॉ. कृष्णमुर्ती, वाठारकर, पेंडसे वगैरे.
ह्या अंकाच्या सुरुवातीलाच देशमुख त्यांच्या बायकोशी फोनवर बोलताहेत, तिला त्यांचे गुरू डॉ. कृष्णमुर्ती ना विमानतळावर रिसीव्ह करण्याविषयी सुचना देताहेत, ह्या काही संवादांमधुन आपल्याला देशमुखांचा करडा काटेकोर, व कर्तव्यतत्पर स्वभाव दिसतो. देशमुख आत्ता उपमंत्री आहेत व लवकरच आरोग्यमंत्री होणार आहेत, आत्ताची सहा ते आठ ही वेळ त्यांच्या जनतासंपर्काची आहे, त्यांचे सहाय्यक डॉ चौधरी भेटायला आलेल्या लोकाना केबिनमधे बोलावतात 'माणुस' व चित्रा प्रवेश करतात, ह्या क्षणापासुनच 'माणुस' आपला वेगळेपणा कुठलेही वेगळे संवाद न म्हणता पण ठळकपणे जाणवुन देतो. माणसाला संवादाला सुरुवात करायची आहे पण तो घुटमळतोय, देशमुखच त्याला बोलायला उद्युक्त करतात.
माणुस: (सर्व शक्ती गोळा केल्यासारखं) ठिक आहे, मी इथे आलोय असं सुचवायला की हे आपण सोडून द्या..
देशमुख: मी सोडून देऊ? काय सोडून देऊ? माझ्या नाही लक्षात येत काय सोडून देऊ?
माणुस: (खंबीरपणाने) आपले उपमंत्रीपद.
ईथे नाटकात ताण निर्माण व्हायला सुरूवात होते, देशमुख आधी चिडतात, उखडतात, नंतर डॉ चौधरी आपल्या पद्धतीने माणसाला हाताळू पाहतात.
चौधरी: तुम्ही काय जनतामंचाचे कार्यकर्ते आहात की काय? का कुठल्या चौकशी आयोगाचे सदस्य वगैरे? किंवा लोकनियुक्त प्रतिनिधी?. आहात कोण तुम्ही?
माणुस: हा.. हा.. आता आल लक्षात.... एक गंभीर सुचना करायला एक सामान्या माणुस इथे शिरतो.. याचा अर्थ.. याचा अर्थ हा की तो कोणीतरी बडा माणुस असला पाहिजे. आता आल माझ्या लक्षात.. अच्छा.. अच्छा.. त्या अर्थाने मी नगण्य माणुस आहे.
त्यानंतर संभाषणा चालु असताना त्या माणसाच्या हेतुबद्दल आपली उत्सुकता वाढतच जाते. ह्या सगळ्या संवादांमधुन पुलंनी नाटकाचा वेग तसुभारही कमी न होता एक रहस्यमय छटा सगळ्या संवादांवर कायम ठेवली आहे. माणसाच्याच बोलण्यातुन आपल्याला देशमुखांचा पुर्वेतीहास, त्यांचे आणि चौधरींचे पुर्वीपासुन बरोबर असणे, त्यांचे हृदयविकार केंद्र, तिथले देशमुखांचे स्थान असा सगळा पट उलगडू लागतो संभाषण थोडे हलकफुलक होतानाच 'आनंद वाठारकर'चा उल्लेख येतो आणि क्षणभर ह्या सगळ्याच्या पलिकडे असणार्‍या खर्‍या गंभीर विषय लख्खकन चमकुन जातो. चौधरी बेरकी आहेत त्यांना सगळे आठवतय पण ते सराईतपणे सगळ विसरल्याचा आव आणतायत.
नंतर माणुस सतत एकामागुन एक पुरावे, पत्रे, आरोप ह्यातुन असह्य दबाव निर्माण करतो, त्यावेळेला पुलंच्या लेखणीचे कौतूक वाटते. तो सगळा संघर्ष अजिबात आक्रस्ताळे पणा न करता केवळ तापमापकाची भुमिका घेउन ते वर्णन करतात, आपल्याला मात्र तो ताण असह्य होतो.
आता देशमुखांना आरोप कळाला आहे, पण त्यांची प्रतिष्ठा, पद त्यांना तो स्विकारु देत नाहिये, मग ते त्या हृदय्विकारकेंद्रात आपण घेतलेले कष्ट, आपल्यावरच्या जबाबदार्‍या, त्यावेळची परिस्थीती ह्या सगळ्या कारणांमधुन स्वतःच्याच विवेकाशी प्रतारणा करत आहेत, अगदी त्याच पटलावर आपल्याला चौधरींच्या प्रतिक्रियेचा कॉट्रास्ट स्पष्ट दिसतो. चौधरींना त्यांच्या विवेकाशी लढायचच नाहिये, त्यांना लढायचय ते माणसाशी, त्या आरोपांशी, चौधरी त्या माणसावर, वाठारकरवर, निरर्गल आरोप करीत राहातात. ह्या संघर्षामधे देशमुखांचे व चौधरींचे दोन मार्ग आपल्याला मनापासुन पटतात, पण पुढच्याच क्षणी माणुस एखाद्याच वाक्याने त्या जस्टिफिकेशनच्या चिंध्या ऊडवुन देतो.
शेवटी खुप तणावपुर्ण प्रसंगानंतर माणुस हे आरोप खरेखोटे करण्यासाठी वाठारकर ला फोन करुन बोलावतात आणि सगळ्या नाटकाचा प्लॉट बदलतो, नाटक अधिक गंभीर वळण घेत आणि पडदा पडतो.
ह्या अंकाचे वैशीष्ठ्य म्हणजे, त्यातले वेगवान संवाद, छोट्या छोट्या संवादातुन निर्माण होणारा अपुर्व संघर्ष
क्रमशः

No comments:

Post a Comment